Posts

Showing posts from April 12, 2020

थम जा जिंदगी

आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं ! मंगेश पाडगावकरांच्या कवितेतल्या या सुंदर ओळी. आयुष्याबद्दलची एक संपूर्ण कविता. पण आयुष्य ? आयुष्य म्हणजे ? तुमच्या दृष्टीने आयुष्य म्हणजे काय ? खूप कष्ट, खूप आराम की नुसतं आला दिवस काढणं ? नाही, आयुष्य म्हणजे आलेला प्रत्येक क्षण रसरसून जगणं, ना कालचा विचार ना उद्याची चिंता, आयुष्य म्हणजे “आज” जगणं, उद्या काय घडणार, आपण कसे असू हे काहीच माहीत नसतं कारण उद्या कोणीच पाहिलेला नसतो. मुंबईकरांना २२ मार्चला कर्फ्यू लागला आणि २४ मार्चपासून असंच काहीसं घडलं, २१ दिवसांसाठी आपलं आयुष्य जणू थांबून गेलं. २१ दिवस घराबाहेर पडता येणार नाही कारण मुंबई लॉकडाऊन करण्यात आली. ती मुंबई जी कितीही रात्र असली तरी झोपत नाही, ती मुंबई जी सगळ्यांना सामावून घेते, ती मुंबई जिची लाईफलाईन असलेली ट्रेन पावसाळ्यातच बंद होते ती मुंबई थांबली. नोकरवर्गाला वर्क फ्रॉम होम मिळालं, विद्यार्थ्यांना परीक्षेआधीच सुट्ट्या मिळाल्या, काहींचे आलेले पाहुणे एकवीस दिवस अडकून पडले तर काहींना हवा असलेला एकांत मिळाला. आता तर लॉकडाऊन अजून व