Posts

Showing posts from July 19, 2015

अस्वस्थता....

सगळं वातावरण स्तब्ध आहे या क्षणी झाडाचं पानदेखील हलत नाहीये, वाऱ्याचं कुठेही अस्तित्व नाहीये कृत्रिम वारा सोडला तर... एक विश्रांत संध्याकाळ आहे ही दिवेलागणीसाठी तयार असलेली, एका तपस्वी, ध्यानस्थ पुरुषासारखी.. दिवसभराच्या कष्टाने थकलेला जीव, कोसळणाऱ्या पावसामुळे जड झालेले ढग, सतत एकमेकांना साद घालून दमलेले पक्षी, भिजलेले वृक्ष, आणि थेंबांचा मारा सहन करून कंटाळलेले दगड, सगळं, अगदी सगळं वातावरण क्षिणलयं... पण मी, मी मात्र या वातावरणात शब्दांशी भांडतेय, मनातल्या सगळ्या भावना कागदावर उतरवण्यासाठी धडपडतेय.. मिळाले आहेत का शब्द मला? कदाचित हो, कदाचित नाही.. पण हेच म्हणायचयं का मला? माहित नाही.. कधी कळेल, काय म्हणायचयं? काय मांडायचयं मला? ठाऊक नाही.. मांडू शकेनही, पण त्यासाठी वातावरण, मन सगळचं सर्जनाच्या अधीन झालेलं हवं, तरच नवनिर्मिती होईल, शब्दांच्या या जाळ्यातून एक सुंदरशी वीण तयार होईल.. एकसंध नसली तरीही जोडलेली असेल, या ना त्या धाग्याने.. तसं पहायला गेलं तर एलसंध काहीच नसतं, आपणच शोधत असतो सगळ्यात संगती.. या रचनेत ना शेवट असेल ना सुरुवात, पण एखादा धा

आज वाटलं पाऊसंच व्हावं.....

पावसाकडे पाहता पाहता आज वाटलं पाऊसंच व्हावं... टप्पोरे थेंब बनून अलगद बरसावं, झाडांच्या मुळाशी हळूच थांबावं, नाजूक सदाफुलीवर रेलावं, पानांवरून मोत्यांच्या माळेसारखं पडावं.. जमलेल्या सगळ्या लहानग्यांना चिंब भिजवावं, त्या दोघांच्या प्रेमळ प्रेमाची साक्ष व्हावं, कागदाच्या होड्यांना हलकेच ओलं करावं, ढगांना साद घालावी, इंद्रधनुष्याला जन्म द्यावा, वाऱ्याशी हितगुज करावं, आणि गारव्याशी भांडावं... कधी श्रावणसर म्हणून बरसावं, तर कधी वळीवाचा पाऊस म्हणून, नाहीतर पडू की नको अशा द्विधा मनस्थितीत असावं, कधीतरी कोणालाही जाणवणार नाही असं रिपरिप यावं, कधी सोसाट्याचा वारा, गारांइतके थेंब घेऊन गरजावं, मात्र कधी संध्यामग्न पुरुषासारखं शांतपणे यावं... नवकवींना लिहिण्यासाठी शब्द द्यावे, विरहाला कंटाळलेल्या तिला सुख द्यावं, आणि प्रत्येकाला जपण्यासाठी एक तरी आठवण द्यावी....